

जालना : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या वतीने आंतरवाली सराटी ते मुंबई अशी पायी दिंडी काढण्यात येणार असून दि. २० जानेवारी रोजी ही दिंडी मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मराठा समाज पायी दिंडी काढून मुंबईत दाखल होणार आहे. दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आंतरवाली सराटी येथून ही दिंडी सुरू होईल. ही दिंडी आंतरवाली सराटीतून निघून शहागड, गेवराई, पाडळशिंगी, पाथर्डी, अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपासमार्गे पुण्यातील शिवाजीनगरमध्ये पोहोचेल. त्यानंतर पुणे-मुंबई महामार्ग, लोणावळा, पनवेल, वाशी चेंबूरमार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचेल.
या दिंडीदरम्यान, विविध भागातील मराठा बांधव या दिंडीत सहभागी होतील. पायी दिंडी ज्या गावातून जाईल त्या गावच्या परिसरातील नागरिकांनी त्या गावच्या ठिकाणी एकत्र येऊन तेथून पुढे प्रवास करावा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे. दरम्यान, ही दिंडी मुंबईतील आझाद मैदानात स्थिरावल्यानंतर त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…