

मुंबई : प्रतिनिधी
खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या जागेसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याची घोषणा करताच कॉंग्रेसकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे.
राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तत्पूर्वी आज कॉंग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यास संमती दिली. याबद्दल कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांनी माहिती दिली आहे. लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…