

धुळे: प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनर ब्रेक फेल झाल्यामुळे थेट एका हॉटेलमध्ये घुसून तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिरपूर येथील पळसनेरमध्ये मध्यप्रदेशच्या सीमेनजीक ही घटना घडली आहे. या अपघातात १५ ते २० जण गंभीर जखमी असल्याचेही समोर येत आहे.
याबाबत माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरून एक कंटेनर जात होता. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळसनेर येथील मध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ आल्यानंतर ब्रेक फेल झाल्यामुळे हा कंटेनर थेट एका हॉटेलमध्ये घुसला. त्यामध्ये अनेकजण चिरडले गेले. या घटनेत तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून जवळपास १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…