

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. या सर्व घटनेनंतर मला कॉँग्रेस नेत्यांसह शरद पवार यांनी आम्ही पाठीशी असल्याचं सांगितलं. मात्र आमच्याच लोकांनी असं वागणं हे माझ्यासाठी दु:खदायक आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही माझ्याजवळ बोलू शकत होता. सुरतला जाण्याची काय गरज होती असा सवाल करत तुम्ही म्हणत असाल तर मी मुख्यमंत्रीपदासह पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या स्थापनेपासून कोरोना काळातील कामकाजाचा आढावा घेतला. शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडले नाही. मात्र काहीजण नाहक त्यावर चर्चा करत असल्याचं सांगताना त्यांनी मागील आठवड्यातील आयोध्या दौऱ्याचा संदर्भ दिला.
मागील दोन दिवसांत शिवसेनेतील बंडाविषयी बातम्या येत आहेत. पण या सर्व गोष्टी माझ्यासमोर येवून सांगायला हव्या. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नकोत तर मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे. इतकंच काय तर पक्षप्रमुख पदाचाही त्याग करायला मी तयार असल्याचे सांगत त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…