

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आले आहे. राज्य सरकारच्या बांठीया आयोगाच्या अहवालानुसार ओबीसी आरक्षणासह पुढील दोन आठवड्यात निवडणुका जाहीर कराव्यात, असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारने दाखल केलेला बांठीया आयोगाच्या अहवाल स्वीकारत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा निकाल दिला आहे. मागील दोन वर्षांपासून निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून निवडणुका घेतल्या पाहिजेत असेही मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या बांठीया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत दिले आहेत. येत्या दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात आता ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील यावर शिकामोर्तब झाले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…