

जालना : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेलं अन्नत्याग आंदोलन आज मागे घेतलं. दोन माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
येत्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा घडवून पुढील प्रक्रिया केली जाईल असं आश्वासन शिष्टमंडळाकडून देण्यात आलं. आता सरसकट आरक्षण द्यायला सरकार तयार झालं आहे. त्यामुळे त्यांना वेळ दिला पाहिजे. मात्र यानंतर पुन्हा वेळ मिळणार नाही ही शेवटचीच वेळ आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांबाबत २ जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. सुरुवातीला २४ डिसेंबरपर्यंत सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशी मागणी केली होती. परंतु शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत मुदत मागितल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी चर्चा करत सरकारला २ महिन्यांचा वेळ देत उपोषण मागे घेतले.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात..
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…