Site icon Aapli Baramati News

Big Breaking : दोन वर्षानंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त; महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनामुळे राज्यात लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनामुळे विविध निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधांमुळे सण, उत्सव आणि विविध कार्यक्रमांवर परिणाम झाला होता. मात्र आता राज्य कोरोनाच्या संकटातून मुक्त झाल्यामुळे सर्व निर्बंध रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, मास्क वापराबाबतही राज्य सरकारने निर्णय घेतला असून ज्यांना आवश्यकता वाटेल त्यांनीच मास्क वापरण्याबाबत सुचित करण्यात आले आहेत. निर्बंधमुक्तीचा निर्णय झाल्यामुळे येणाऱ्या काळातील सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version