

मुंबई : प्रतिनिधी
तब्बल ऑक्टोबर महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये राज्य शासनाकडून विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हावं असं उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्यापासून संप सुरु आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांशी अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पगारवाढीसह अन्य काही निर्णय घेतले. तरीही संप सुरुच आहे.
सध्या या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. बुधवारी न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिला आहे. आम्ही आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत त्यांची बाजू ऐकली आहे. त्यामुळे १५ तारखेपूर्वी कामावर हजर व्हावं, त्यानंतर मात्र राज्य शासन कारवाई करु शकेल असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…