

राळेगणसिद्धी : प्रतिनिधी
राज्य सरकारने वाईन विक्रीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला या निर्णयाबद्दल पत्र पाठवल्यानंतरही कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने १४ फेब्रुवारीपासून अण्णा हजारे हे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
राज्य सरकारने राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रही पाठवले. मात्र अद्याप राज्य सरकारकडून अण्णा हजारे यांना प्रतिसाद मिळालेला नसल्याने त्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या सोमवारपासून म्हणजेच दि. १४ फेब्रुवारीपासून अण्णा हजारे हे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्याचवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी राज्यभरात विविध प्रकारे आंदोलन करून राज्य शासनाच्या निर्णयाचा विरोध केला जाणार आहे.
अण्णा हजारे यांनी मागील काळात अनेक विषयांवर आंदोलनं करत सरकारचे लक्ष वेधले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर ते आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…