महाराष्ट्र

राज्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना असंवेदनशील सत्ताधारी हार-तुरे, सत्कारात मश्गुल : अजितदादांचं टिकास्त्र

अतिवृष्टीबाधित भागात ओला दुष्काळ जाहीर करा; कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये तर बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत द्या

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या महिनाभरापासून राज्यातील बहुतांश भाग अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बेहाल आहे, लाखो हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे, पूराच्या पाण्याने हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे, हजारो जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत, अनेक घरांची पडझड झाली आहे, अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. राज्यावर अभूतपूर्व असे नैसर्गिक संकट आले असताना असंवेदनशील शिंदे सरकार हार-तुरे आणि सत्कार घेण्यात मश्गूल आहे, असा घणाघात करत राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय विरोधी पक्ष स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधान सभा सभागृहात सत्ताधाऱ्यांना दिला.

विधानसभा सभागृहात नियम २९३ अन्वयेच्या ‘अतिवृष्टीने राज्यात झालेल्या नुकसानी’च्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्यावर कोणतेही संकट आले तर संकटग्रस्तांची सर्वात पहिली अपेक्षा सरकारकडून असते, मात्र आपत्तीच्या काळात राज्यातील जनतेला मदत करण्यात, धीर देण्यात शिंदे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. गेल्या महिनाभरापासून अधिकच्या कालावधीपासून राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीने थैमान घातले आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील, विशेषत: विदर्भ, मराठवाड्यासह इतर भागातील जवळपास १५ लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. अजूनही अनेक ठिकाणी पूर्ण पंचनामे झालेले नाहीत, काही जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरु आहे, त्यामुळे नुकसानीचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आम्ही विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली.  शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि व्यथा जाणून घेतल्या. प्रशासनाशी चर्चा केली, नुकसानीचा अंदाज घेतला. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, हजारो हेक्टर क्षेत्रावरील जमीन खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये हजारो जनावरांसह गोठ्यातील चारा व खतेही वाहून गेली आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे पीक कर्ज घेतले, पण पीक वाहून गेल्यामुळे पीक कर्ज भरणे शक्य होणार नाही.  त्यामुळे हे संपूर्ण कर्ज माफी करण्याची आवश्यकता आहे. अतिवृष्टीमुळे अनेक विहिरींची पडझड झाली, काही वाहून गेल्या, काही खचल्या आहेत.  या सर्व विहिरींच्या डागडुजीसाठी मनरेगामधून विशेषबाब म्हणून परवानगी आणि निधी देण्याची आवश्यकता आहे. ठिबक आणि तुषार संचात गाळ जाऊन नादुरुस्त झाले, हजारो शेतकऱ्यांच्या मोटारी जळाल्या, जमिनी खरडून गेल्या, हजारो हेक्टर शेती नापिकी होण्याची आज भीती शेतकऱ्यांच्या मनात असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

राज्यातील आदिवासी पट्टयात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान होऊन प्रामुख्याने भातशेती उद्ध्वस्त झाली आहे. आदिवासी बांधवांना रोख स्वरुपात खावटी अनुदान तातडीने देण्यात याव. ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’चे निकष कालबाह्य झाले असून ते बदलण्याचे आवश्यकता आहेत. याबाबत देशाच्या सन्माननीय पंतप्रधान महोदयांकडे राज्याचे शिष्टमंडळ जाऊन आले होते, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होतो. आता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.


ह्याचा प्रसार करा
आपली बारामती न्यूज

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago