

मुंबई : प्रतिनिधी
ड्रग्स प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. स्वत:वरील आरोप दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे प्रकरण बाहेर काढले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली हे माहिती होते. तेव्हा त्यांनी मलिक यांच्यावर कारवाई का केली नाही असा सवाल करून प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपल्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी दुसरी माहिती समोर आणायची ही पद्धत आहे. फडणवीसांनी आपल्यावरील आरोप आणि स्वत:चे प्रकरण दाबण्यासाठीच मलिक यांचे प्रकरण बाहेर काढले आहे.
या सगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाची भूमिका महत्वपूर्ण आहे. न्यायालयाने आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल असलेले सगळे खटले निकाली काढायला हवेत, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…