

रत्नागिरी : प्रतिनिधी
एकेकाळी एकाच पक्षात असलेल्या खासदार सुनील तटकरे आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात चांगलाच कलगितुरा रंगला आहे. भास्कर जाधव यांनी मी कुणबी समाजाला विधानपरिषदेची जागा द्या म्हटलो तर त्यांना मिरच्या का झोपल्या ? असा प्रश्न उपस्थित करत सुनील तटकरे हे राष्ट्रवादी नाहीतर कुटुंबवादी आहेतअशी घणाघाती टीका केली आहे. जर अंगावर आला तर भास्कर जाधव शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली. भास्कर जाधव म्हणाले, सुनील तटकरे यांनी नेहमी राष्ट्रवादीचे नाव घेत सर्व पदे आपल्या घरात घेऊन कुटुंबवादी राजकारण केले आहे. विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला देण्यात यावी, ही मागणी असताना त्यांना मिरच्या झोंबल्या ? सगळी राजकीय पदे आपल्या घरात ठेवायची आणि सर्वसामान्याच्या राजकारणाची राख करायची हेच धोरण सुनिल तटकरे यांचे राहिलेले आहे.
बोगस कंपन्या काढून गोरगरिबांच्या व शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी लुबाडायच्या. हजारो कोटी रुपये कमवायचे. त्यांना नीतिमत्तेची आणि उपकाराची जाण नाही. त्यामुळे सुनील तटकरे यांना मी मार्गदर्शन करू शकत नाही असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील वाद सर्वांसमोर आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नांदगाव येथील आमदार सुहास कांदे यांचा वाद चांगलाच उफाळून आला होता. अशातच आता पुन्हा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यात कलगितुरा रंगला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…