

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपचे संबध का बिघडले? यावर शिवसेना नेते खा. संजय राऊतांनी भाष्य केले . संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे शिवसेनेत येणार होते.मात्र बाळासाहेबांच्या सांगण्यावरून गोपीनाथ मुंडे भाजपात राहिले होते,असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, शिवसेना आणि भाजपाचे संबंध कोणामुळे बिघडले. यावर एकदा प्रकाश टाकायला हवा. आज प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असते तर, शिवसेना आणि भाजपचे संबंध इतके विकोपाला गेले नसते.
पक्षात असंतोष आणि घुसमट होत असल्यामुळे गोपीनाथ मुंडे पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. त्यांनी दिल्लीत जाऊन नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडे शिवसेनेत येण्याच्या तयारीत होते.
त्यावेळी बाळासाहेबांनी गोपीनाथ मुंडे यांना बाळा तू शिवसेनेत येऊ नको. दिवस बदलत असतात. तू लढत रहा असा सल्ला दिला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी दिलेला सल्ला गोपीनाथ मुंडे यांनी ऐकला, असे संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात नमूद केले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…