

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश लखीमपुर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांनी संयुक्तपणे आवाज उठवण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यांनी कालच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे शिष्टमंडळ शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
लखीमपुर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह पत्रकाराचा मृत्यू झाला आहे . या घटनेनंतर सर्व विरोधी पक्ष भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात आक्रमक झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काल दुपारी राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली. भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे त्यांनी जाहीर केलेले नाही.
याचदरम्यान, शिवसेना आपले शिष्टमंडळ लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पाठवणार असल्याची माहिती पुढे येत आहे. काल संजय राऊत यांनी ट्विट करत लखीमपुर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या आंदोलनात झालेली हिंसाचाराची घटना देशाला हादरा सोडवणारी असल्याचे नमूद करत भाजपवर निशाणा साधला होता. तसेच प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने अटक केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यापासून रोखले जात आहे. या दबावशाहीच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…