राज्यात गेल्या काही दिवसांपासून एक तक्रारदार गायब आहे : उद्धव ठाकरे यांचे सरन्यायाधीशांसमोर वक्तव्य

ह्याचा प्रसार करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एक तक्रारदार गायब आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्यासमोर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर केली आहे. 

सरन्यायाधीश एन. व्ही रमण्णा यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी परमवीर सिंग यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. 

काही महिन्यांपूर्वी परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित त्यांच्याकडे तक्रार केली होती. या पत्रामध्ये त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी चालू आहे.

परमवीर सिंग यांच्यावरही अनेक आरोप आणि तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यासुद्धा तक्रारींची चौकशी चालू आहे. मात्र परमवीर सिंग तपास यंत्रणा तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगासमोर अद्याप हजर झालेले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून परमवीर सिंग यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. सध्या परमवीर सिंग कोठे आहेत कोणालाच माहिती नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांसमोर टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अगोदर झालेल्या एका भाषणात एक आरोपी 1958 पासून गायब झाल्याचा उल्लेख झाला होता. त्याच उल्लेखाची नोंद करत आमच्याही राज्यात गेल्या काही दिवसांपासून एक तक्रारदारच गायब झाला. त्याने तक्रार केली, पळून गेला, कोठे पळून गेला हे काहीच माहिती नाही. त्याने तक्रार केली त्यानुसार तपास चालू आहे. धाडीचे सत्र इकडे तिकडे चालू आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सद्यस्थितीत महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या अतिरेकाबाबत नाराजी व्यक्त केली.  


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago