

मुंबई : प्रतिनिधी
प्राथमिक शाळा सुरू कधी होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. टास्क फोर्सकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्य सरकारने प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील सर्व प्राथमिक शाळात पहिली ते चौथीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पहिली ते चौथीच्या वर्गातील मुले लहान आहेत. त्यामुळे मागील वेळी बरीच खबरदारी घेण्यात आली. मात्र सर्वच मुलांसाठी शाळेत जाणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात टास्क फोर्ससोबत चर्चा करून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली.
वर्षाताई गायकवाड म्हणाल्या , कोरोनाचे सर्व नियम पाळत शाळा चालू करण्यास काही हरकत नाही, असे टास्क फोर्सचे म्हणणे आहे. मतीमंद मुलांच्याही शाळा सर्व नियम पाळून चालू करण्यात येणार आहे. त्यासोबतच निवास शाळांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. विद्यार्थी पुन्हा शालेय जीवनात यावे, याकरिता पहिली ते चौथी चे वर्ग चालू करण्याचा राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला असल्याचे वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…