

पुणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, त्यांना काही दिवसापूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते सध्या आराम करत आहेत. त्यांच्या तब्येतीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘मुख्यमंत्र्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दररोज फोन करत आहे. मात्र ते फोन घेत नाहीत’ असा गौप्यस्फोटच केला आहे.
पुणे दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबद्दल विचारणा केली. मी तब्येतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दररोज फोन करत आहे. मात्र मुख्यमंत्री माझा फोन घेत नाहीत. परंतु शिवसेनेतील अनेक नेतेमंडळींशी ओळख आहे. मी त्यांच्याकडेही मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असतो. सभागृहात कधीकधी संजय राऊत भेटत असतात. त्यांना मी तुमच्या साहेबांची तब्येत कशी आहे ? असं विचारत असतो. आमच्या साहेबांची तब्येत ठीक आहे, असे उत्तर संजय राऊत उत्तर देत असतात, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानदुखीच्या त्रासामुळे नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेक दिवस रुग्णालयात दाखल असलेल्या उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र त्यांना डॉक्टरांकडून सक्तीची विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सद्यस्थितीत ऑनलाईन पद्धतीने बैठकांना हजेरी लावून आपले नियमित कामकाज करीत आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…