

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेकडून राष्ट्रवादीसोबत युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु काही कारणास्तव तसे झाले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राष्ट्रवादीसोबत जाण्याची इच्छा होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर भाजपसोबत युती तोडण्याचा विचार केला होता. दहा वर्षांपूर्वी शिवसेनेने ती मानसिकता तयार केली होती. काँग्रेससोबत असताना राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव शिवसेनेकडून देण्यात आला होता. परंतु काही कारणास्तव आघाडी शक्य झाली नाही. आघाडीचा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला. भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे, हे पाच वर्षांचा निकाल पाहिला तर लक्षात येते, असे मलिक यांनी म्हटले आहे.
शिवसेना काय आहे हे समजल्याने भाजप अशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. शिवसेनेला संपविण्याचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मदतीने केले. भाजपमुळे शिवसेना कमकुवत झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथे २५ वर्षे युतीत सडलो, खळबळजनक वक्तव्य केले होते. शिवसेनेची ताकद आता वाढत आहे. भाजपसोबत कमकुवत झालेल्या शिवसेनेचा आता आलेख कितीतरी पटीने वाढत आहे, हे नगरपालिकांच्या निकालावरून दिसून आले आहे, असेही ते म्हणाले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…