

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपच्या १२ निलंबित आमदारांनाही मतदान करता येईल असा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या निलंबित आमदारांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
जुलैमध्ये विधानसभेचे अधिवेशन चालू असताना तालिका अध्यक्षांना धक्का बुक्की, शिवीगाळ व इतर गैरवर्तणूकप्रकरणी भाजपाच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. अद्याप त्यांच्या निलंबनाची एक वर्ष पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्यांना या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता येईल का असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला होता.
दरम्यान , राजीव सातव यांच्या निधनाने राज्यातील राज्यसभेची त्यांची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोट निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे . त्यामध्ये निलंबित केलेल्या आमदारांना या निवडणुकीसाठी मतदान करता येईल, असे सांगण्यात आले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…