

सांगली : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना एका कार्यक्रमासाठी पोहोचण्यास उशीर झाला. यावरून जयंत पाटील यांनी धनुष्यबाण आणि हाताच्या नादाला लागून आता तर घड्याळ्याची वेळही चुकू लागली आहे असे म्हणत जोरदार टोलेबाजी केली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जयंत पाटील यांच्या हस्ते स्व. गुलाबराव पाटील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मंत्री लोक स्वतःचीच जिल्हा बँकेच्या संचालकपदी वर्णी लावून घेत आहेत. हे चुकीचे आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, अशा शब्दात जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेवर संचालक झालेल्या मंत्र्यांना कानपिचक्या लावल्या. त्यामुळे जयंत पाटील यांचा रोख नेमका कोणाकडे होता याबद्दल कार्यक्रमस्थळी चांगलीच चर्चा रंगली.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांना द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. पिक विमा कंपनीचे असलेले निकष आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामध्ये ताळेबंद बसत नाही. त्यामुळे डाळिंब आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज वसुलीमध्ये जिल्हा बँकेने सवलत द्यायला हवी, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सूचित केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…