

मुंबई : प्रतिनिधी
भाजपला देशात ऐक्य नको आहे. ही बाब शरद पवार यांनी आम्हाला २५ वर्षांपूर्वी सांगितली. मात्र मागच्या दोन वर्षांपूर्वी हे सगळे आम्हाला कळायला लागले, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पवारसाहेबांनी आधीच सांगितलं होतं; मात्र आम्हाला हे कळायला फार उशीर झाला असा मिश्किल टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ६१ भाषणाच्या ‘नेमकचि बोलणे’ या भाषण संग्रहाच्या प्रकाशनाचा सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रीमंडळातील प्रमुख, विविध पदाधिकारी, लेखक आणि साहित्यिक उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल चढवला.
शरद पवार यांनी सध्या आपल्या देशात चालू असलेल्या विकृत राजकारणाविषयी त्यांच्या भाषणात २५ वर्षीपूर्वीच कोरडे ओढले आहे. भाजपला देशात ऐक्य नको हे त्यांनी हे २५ वर्षीपूर्वीच सांगितले होते. मात्र ते आमच्या दोन वर्षापूर्वी लक्षात आले. त्यांनी १९९६ मध्येच सांगितले होते की, भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. देशाचे तुकडे करत आहे. परंतु हे सगळे आम्हाला आता कळायला लागले.
दिल्लीत संजय राऊत यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली होती. यावरून विरोधी पक्षांकडून संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात आले. त्यावरही राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, मी पवारसाहेबांना खुर्ची का बसायला दिली याचे कारण माहिती करायचे असेल त्यांनी ‘नेमकचि बोलणे’ हे पवार साहेबांच्या भाषणाचे पुस्तक वाचावे. अत्यंत विकृतपणे टीका करणाऱ्यांना हा ग्रंथ वाचल्यावरच संस्कृती काय असते ते कळेल.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…