देशात भाजपला ऐक्य नको हे पवारसाहेबांनी सांगितले होते, पण आम्हाला दोन वर्षांपूर्वी समजले : संजय राऊत

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

भाजपला देशात ऐक्य नको आहे. ही बाब शरद पवार यांनी आम्हाला २५ वर्षांपूर्वी सांगितली. मात्र मागच्या दोन वर्षांपूर्वी हे सगळे आम्हाला कळायला लागले, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पवारसाहेबांनी आधीच सांगितलं होतं; मात्र आम्हाला हे कळायला फार उशीर झाला असा मिश्किल टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ६१ भाषणाच्या ‘नेमकचि बोलणे’ या भाषण संग्रहाच्या प्रकाशनाचा सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रीमंडळातील प्रमुख, विविध पदाधिकारी, लेखक आणि साहित्यिक उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल चढवला.

शरद पवार यांनी  सध्या आपल्या देशात चालू असलेल्या विकृत राजकारणाविषयी त्यांच्या भाषणात २५ वर्षीपूर्वीच कोरडे ओढले आहे. भाजपला देशात ऐक्य नको हे त्यांनी हे २५ वर्षीपूर्वीच सांगितले होते. मात्र ते  आमच्या दोन वर्षापूर्वी लक्षात आले. त्यांनी १९९६ मध्येच सांगितले होते की, भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. देशाचे तुकडे करत आहे. परंतु हे सगळे आम्हाला आता कळायला लागले.

दिल्लीत संजय राऊत यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली होती. यावरून विरोधी पक्षांकडून संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात आले.  त्यावरही राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, मी पवारसाहेबांना खुर्ची का बसायला दिली याचे कारण माहिती करायचे असेल त्यांनी ‘नेमकचि बोलणे’ हे पवार साहेबांच्या भाषणाचे पुस्तक वाचावे. अत्यंत विकृतपणे टीका करणाऱ्यांना हा ग्रंथ वाचल्यावरच संस्कृती काय असते ते कळेल.


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago