

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधारी नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावण्यामागे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे कारस्थान आहे. अधिकाऱ्यांना ते प्रत्येक नेत्यामागे ईडी कशी लावायची याचे मार्गदर्शन करतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न फडणवीस जरी करत असले तरी राज्यातले सरकार आमच्या ताब्यात राहणार आहे. आम्ही केंद्रातील सरकारही लवकरच ताब्यात घेऊ, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रातील भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजप करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे ईडी लावत आहेत. ईडी लावल्याने सरकारमधून हे पक्ष बाहेर पडतील, असे त्यांना वाटत आहे. पण त्यांचा हा गैरसमज असल्याचा त्यांनी सांगितले.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर पत्रकार परिषद घेऊन भाजपने टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देत मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…