

इंदापूर : प्रतिनिधी
माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील अवसरी येथे शुक्रवारी झालेल्या जळीत ऊस पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शासनाने या घटनेचे त्वरीत पंचनामे करून अवसरी येथील शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली.
शेतकऱ्यांनी जीवापाड कष्ट करून ऊस पीक सांभाळले होते. त्याला तोडही आली होती. परंतु अचानक लागलेल्या आगीने ३५ एकरांतील ऊस जळून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरून या नुकसानीची त्वरीत पाहणी करून पंचनामे करावेत आणि संबंधित शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
महावितरणच्या निष्क्रिय कारभारामुळे हा प्रकार घडल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी तारा जीर्ण झाल्या असल्याने स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, संचालक शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, अवसरीचे सरपंच संदेश शिंदे, भाटनिमगावगावचे सरपंच अजित खबाले, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, आदित्य शिंदे, अंकुश जाधव, दत्तात्रय मगर, पोपट गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…