

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना महामारीत महागाईच्या झळा बसल्याने केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्क कपात केली होती. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये खाद्यतेलांच्या दरात कमालीची घसरण झाली होती.परंतु गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. त्याचाच फटका भारतीयांना बसला आहे.या युद्धामुळे सूर्यफूल तेलाच्या दरात कमालीची वाढ झालेली दिसत आहे.
गेल्या १५ दिवसात सूर्यफूल तेलाचे दर प्रतिलिटर मागे तब्बल ४५ रुपयांनी वाढले आहेत. केवल एका महिन्यातच तेलाच्या दरात वाढ झाली असून १२५ रुपयांवरून १७० ते १८० रुपयांकडे तेलाचे दर पोहोचले आहेत. त्यामुळे या युद्धामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे महिनाभराची बजेट कोलमडल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
भारत देशात एकूण खाद्यतेलांपैकी ८० टक्के खाद्यतेल हे आयात केले जाते. त्यापैकी सगळ्यात जास्त आयात ही युक्रेन या देशांमधून केली जाते. परंतु रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून होणारी आयात बंद झाली आहे. त्यामुळे शहरात खाद्यतेलांचा प्रामुख्याने सूर्यफुलाच्या तेलात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…