

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. आपणही एक धाड टाकावी म्हणून आजची पत्रकार परिषद घेत असल्याचे सांगत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकारांशी संवाद साधतांना भाजपसह केंद्रीय सक्तवसुली संचालनालय अर्थातच ईडीवर आरोप केले आहेत. ईडीकडून चालू असलेली वसुली आजवरचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ते यासंदर्भात चौकशी करणार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून विविध मार्गाने वसुली करण्याचे काम चालू आहे. त्यांच्याकडून अनेक बिल्डर्स आणि व्यावसायिकांना धमकावले जात आहे. अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांवर अनेक कंपन्यांकडून कोट्यावधी रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. हा वसुलीचा घोटाळा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. याबाबत आपण पुरावा देणार आहोत. आयकर विभागाला ५० पत्रे पाठवली. परंतु या पत्रांची दखल घेतली जात नाही. मी एक खासदार असताना देखील पत्रांची दखल घेतली जात नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
चार ईडीच्या आधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आजपासून मुंबई पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत. यामध्ये अनेक अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत. यांच्यासोबत भाजपाचे अनेक नेतेही असणार आहेत. ईडीच्या वसुली घोटाळ्याप्रकरणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २८ पानी पत्र लिहिलं आहे. याबाबतची सर्व माहिती पंतप्रधानांना दिली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…