

मुंबई : प्रतिनिधी
ऐन दिवाळीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून चांगली टीका होत आहे. आधी १०० रुपयांनी दर वाढवायचे आणि नंतर त्यामध्ये पाच-दहा रुपये कमी करायचे ही केंद्र शासनाची खेळी आहे. जर पेट्रोलचे दर ५० रुपयांनी स्वस्त करायचे असतील तर देशभरामध्ये भाजपाचा पराभव करावा लागेल, असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राने पेट्रोलचे भाव वाढवून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. सरकारने इंधनाच्या दरामध्ये वाढ करून बेहिशोबी मालमत्ता कमावलेली आहे असे सांगून संजय राऊत यांनी पेट्रोलचा दर पाच रुपये कमी करून काय होणार आहे ? असा सवाल उपस्थित केला. केंद्राचे मन मोठे नाहीतर सडके आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की , सणासुदीचे दिवस चालू आहेत. आगोदरच महागाईने जनता त्रस्त झालेली आहे. सणापूर्वीच पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, किराणा मालाचे दर कमी करायला हवे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जनतेला लुटण्याची वृत्तीच भाजपने दाखवून दिली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने एक-दोन रुपयांमध्ये रुपये इंधनाच्या दरांमध्ये कपात केली आहे. सरकारने या दरांमध्ये निर्णय चांगल्या मनाने घेतलेला नसून कपात करण्याचा निर्णय भीतीपोटी घेतलेला आहे. मात्र जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनता तुम्हा धडा शिकवेल, असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…