

पुणे : प्रतिनिधी
गेल्यावर्षी केंद्र शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात सद्यस्थितीत गर्दी टाळली जावी या उद्देशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी जे निर्बंध आहेत त्याचे पालन नागरिकांकडून होताना दिसत नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर नाईलाजास्तव कठोर निर्बंध करावे लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
आज पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकांनी सद्यस्थितीत नियमांचे पालन करून शासनाला सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन केले आहे. गत वर्षी कोरोनाची पहिली लाट असताना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. आता दुसरी लाट गेल्यावर्षीपेक्षा भयंकर आहे. त्यामुळे राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र दिसत असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
वास्तविक नागरिकांना लॉकडाऊनमुळे त्रास होवू नये यासाठी काही सेवा शिथिल करण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे गांभीर्य न राखता नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होणार असेल तर कठोर निर्बंध लादणे हाच पर्याय असल्याचे स्पष्ट करून अजित पवार यांनी नागरिकांनी शासनाला सहकार्याची भूमिका ठेवली तरच पुढील संकटाला तोंड देता येणार असल्याचे सांगितले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…