

बारामती : प्रतिनिधी
वाढत्या इंधन दरामुळे केंद्र सरकारवर रोष वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून दर कपात करण्यात आली आहे. हे दर तसेच कमी राहावेत, अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असे निमित्त सांगून पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर त्याच किंमतीवर आणून ठेवतील असे होऊ नये एवढीच अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत म्हटलंय.
आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, देशभरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. मात्र असे असले तरी देखील हे दर अशीच कायम कमी राहावेत, अन्यथा पुन्हा त्याच स्थितीवर हे दर आले, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
तेलाच्या किमती वाढवण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यानुसार केंद्र सरकार या तेलाच्या किमती वाढवते किंवा कमी करते. कोणतेही सरकार असले तरी गोरगरीब जनतेला संसार चालवायला परवडले पाहिजे अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली पाहिजे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.
राज्य सरकारने यापूर्वीच हे दर कमी केले आहेत राज्य सरकारने त्यांचा कर कमी करताना सर्वसामान्य माणूस टॅक्सी चालक वाहन चालक या सर्वांचा विचार केला आणि एक हजार कोटींचा बोजा सहन करत यापूर्वीच सीएनजीचा दर कमी केले मात्र हे दर पुन्हा वाढले असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…