

बारामती : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यामुळे बारामती नगरपरिषदेने शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय स्थगित करण्यात आला असून बारामतीकरांना पूर्ववत पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या बंद आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा पुरवठा आणि उपलब्धता याची सांगड घालण्यासाठी म्हणून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र तत्पूर्वीच नगरपरिषदेने हा निर्णय स्थगित केला आहे.
पाणी कपातीचा निर्णय स्थगित केल्यामुळे बारामती नगरपरिषदेकडून आता बारामती शहरात पूर्वीप्रमाणेच नियमित पाणीपुरवठा होणार आहे. नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद असले तरी शहरात साठवण तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असते. त्यामुळे आता बारामतीतील पाणी कपात रद्द झाली असून बारामतीकरांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…