

माळेगाव : प्रतिनिधी
बारामतीत सध्या विविध विकासकामे सुरु आहेत. विकास करताना अनेकदा काही बाबतीत कटूपणा घ्यावा लागतो. मात्र संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर निश्चितच समाधान होईल असेच असेल, असे सांगतानाच जोपर्यंत बारामतीकरांची साथ आहे तोपर्यंत चुकीचा निर्णय घेणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राजहंस संकुलाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, पौर्णिमा तावरे, संदीप जगताप, प्रशांत काटे आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डाव्या कालव्यावर तब्बल २४ पूल बांधले जाणार आहेत. ग्रामस्थांची सुविधा होईल, या उद्देशाने हे पूल बांधले जाणार आहेत असे सांगून अजित पवार म्हणाले, मध्यंतरी बारामती शहरातील एक पूल पाडला. त्यावरून सोशल मिडीयात काहींनी टिका केली. मात्र याकडे मी दुर्लक्ष केले.
विकासकामे करताना कटूपणा घ्यावा लागतो. मात्र संबंधित विकासकामे पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच समाधान लाभते, असेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…