

सोलापूर : प्रतिनिधी
आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी सोडले जाणार आहे. त्याच बरोबर हे आवर्तन महिनाभर सुरू राहणार आहे. टप्प्याटप्याने तब्बल तीन हजार दोनशे क्युसेकने उजनीतून पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
सध्या उजनीमध्ये ९७. ७२ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून त्यापैकी ३४ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ११४ टीएमसी इतकी या धरणाची साठवण क्षमता आहे. तर सुमारे १४ टीएमसी इतका या धरणात गाळ असून लवकरच गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
दरवर्षी या धरणातून केवळ एकच आवर्तन सोडण्यात येते. परंतु यावर्षी पावसाळा लांबणीवर पडल्यामुळे दोन आवर्तने सोडण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या पार पडलेल्या बैठकीत दोन आवर्तनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी हे धरण वरदानच ठरले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…